
About
Send us Fan Mail
वामन अवतार कथेत बळीराजाकडे श्रीविष्णू भिक्षेमध्ये तीन पावले भूमी मागतात. बळी त्यांना तीन पावले जमीन देण्याचे वचन देतो. मग वामन रूपातील विष्णू एका पावलात स्वर्ग व दुसऱ्या पावलात पृथ्वी व्यापल्यावर आता “तिसरे पाऊल कोठे ठेवू?” असे विचारतात. सत्यवचनी राजा बळीवर धर्मसंकट ओढवते. देण्यास काहीच जागा शिल्लक राहिली नाही, परंतु तरीही जर दिलेल्या वाचनाला जागलो नाही तर तो अधर्म ठरेल असा विचार करून शेवटी राजा बळी वामनासमोर आपले डोके धरतो व आपल्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवावे, अशी विनंती करतो. वामन अगदी तेच करतो आणि राजा बळीला पाताळात ढकलतो.