
About
Send a text
आज्जी चांगल्या घरच्या दिसत होत्या. अगदी गळून गेल्या होत्या थकव्याने. घाबरलेल्या स्थितीत होत्या. कोणत्याही प्रश्नाचे नीट उत्तर देता येत नव्हते. कसंबसं हे कळलं की कोणीतरी त्यांना बाइकने धक्का मारला आणि त्या पडल्या. ज्याची बाईक होती तो तसाच निघून गेला.
त्या सतत एकच गोष्ट सांगत होत्या ,'मी माझ्या मुला सोबत आले, हरवले आणि माझ्या जवळ १०० रुपये होते ते सुद्धा चोरले.